विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी शुक्रवारी आक्रोश मोर्चा काढत शासन आणि आयोगाविरोधात संताप व्यक्त केला. आमखास मैदान ते विभागीय आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात आला. आमदार रोहित पवार यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व सुरक्षित करावी, पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई करावी, आरोपींचे नेटवर्क उघड करावे, CDR तपासणी व फॉरेन्सिक ऑडिट करावे, गट-ब परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर करावा, परीक्षा केंद्रांबाबत पारदर्शकता ठेवावी यासह विद्यार्थ्यांनी १२ प्रमुख मागण्या केल्या.
पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवित्यावर परिणाम होत असल्याने शासनाने मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
No Comment! Be the first one.